'रक्षक' सापळा
शेतीमध्ये किड नियंत्रणासाठी रक्षक सापळा
फळमाशी ही एक नुकसानकारक कीड असून आंबा, पेरु, चिकू, बोर, द्राक्षे इत्यादी फळांचे तसेच भोपळेवर्गीय भाज्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान करते. फळमाशीमुळे फळे पूर्ण वाढ न होता गळून पडतात किंवा वेडीवाकडी वाढतात आणि सडून जातात. फळे बाहेरुन चांगली दिसत असली तरी त्यामध्ये अळया पडतात.
फळमाशीचे नियंत्रण रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीने करणे अवघड आहे. कारण किडीच्या अळया फळाच्या आत असतात आणि कोष जमिनीत असतात. तसेच फळभाज्यांची काढणी झाल्यानंतर अल्पावधीतच त्याचा उपयोग खाण्यास करावा लागतो. त्यामुळे कीटकनाशकांचा विषारी अंश फळांवर शिल्लक राहतो.
फळमाशी नियंत्रणातील अडचणी लक्षात घेऊन फळमाशांना आकर्षित करुन व जायबंदी करुन मारण्यासाठी विद्यापीठाने एक रासायनिक सापळा विकसित केला आहे. मिथिल युजेनॉल हे रसायन निसर्गत: तुळस, दालचिनी इत्यादी वनस्पतींमध्ये आढळते. या द्रव्याकडे फळमाशीचे नर आकर्षून
घेण्याचा गुणधर्म असतो. कोषातून बाहेर पडल्याबरोबर मेथिल युजेनॉलच्या वासाने नर फळमाशा या सापळ्याकडे आकर्षित होतात आणि सापळ्यामध्येच अडकून राहतात आणि शेवटी कपडे धुण्याच्या साबणाची ( कोणतीही) ५ ग्रॅम पावडर प्रति लीटर पाण्यात मिसळलेल्या द्रावणात पडून मरतात.
हा रासायनिक सापळा प्लॅस्टिकचा बनविला असून त्यामध्ये फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्यासाठी ठेवायचे रासायनिक आमिष ( मिथाईल युजेनॉल) एका जाळीदार डबीत ठेवण्यात येते. या अमिषाकडे आकृष्ट झालेले नर त्या बरणीत जायबंदी होतात.
शेतीमध्ये किड नियंत्रणासाठी रक्षक सापळाफळमाशीच्या मादी माशांना जननक्षम होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो. त्यानंतर मिलनासाठी आवश्यक असलेले नर उपलब्ध न झाल्याने माद्यांनी घातलेली अंडी उबत नाही आणि परिणामत: फळमाशीचे नियंत्रण होते. फळमाशी नियंत्रणाचे 'रक्षक' सापळे हेक्टरी ४ या प्रमाणे वापरल्यास कलिंगड आणि आंबा पिकातील फळ माशीचे योग्यप्रकारे नियंत्रण करता येते.
रक्षक सापळ्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
किड नियंत्रण: रक्षक सापळे विविध प्रकारच्या किड्यांना आकर्षित करून त्यांचा नाश करण्यास मदत करतात, ज्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते.
नैसर्गिक आणि जैविक पद्धत: हे एक पर्यावरणस्नेही उपाय आहे, ज्यामुळे रासायनिक कीटकनाशकांच्या वापराची गरज कमी होते. हे जैविक शेतीसाठी आदर्श आहे.
आरोग्यासाठी सुरक्षित: रासायनिक कीटकनाशकांपेक्षा रक्षक सापळे वापरणे अधिक सुरक्षित आहे, ज्यामुळे शेती उत्पादनांमध्ये हानिकारक अवशेष राहात नाहीत.
कमी खर्च: रासायनिक कीटकनाशकांपेक्षा रक्षक सापळे स्वस्त आणि दीर्घकालीन उपाय आहेत. एकदा सापळे बसवल्यावर त्यांचे देखभाल खर्च कमी असतात.
विशिष्ट किड्यांना लक्ष्य: हे सापळे विशिष्ट किड्यांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन केलेले असतात, ज्यामुळे इतर उपयुक्त कीटकांना हानी पोहोचत नाही.
उत्पादनवाढ: किड्यांमुळे होणारे नुकसान कमी झाल्यामुळे, शेतीतील उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळतो.